देवीच्या विसर्जन मिरवणुकीला वादाचे गालबोट

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Oct-2018
Total Views |


 


मुंबई: दादर चौपाटीजवळ रात्री १.३०च्या दरम्यान देवी विसर्जनासाठी आलेल्या दोन मंडळांमध्ये वादावादी झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की यामध्ये एकाच मृत्यू झाला. शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

 

विसर्जनासाठी आलेल्या मानखुर्द येथील जय अंबे मित्र मंडळ आणि धारावीतील जय भवानी महिला मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये काही कारणांमुळे वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले. जय अंबे मित्र मंडळाच्या कार्यकर्ते अविनाश आणि स्टेलिन यांनी भवानी महिला उत्सव मंडळाचा कार्यकर्ता जगदीश नंदू कदम याला जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत जगदीशला गंभीर दुखापत झाली. त्याला नंतर केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अविनाश आणि स्टेलिन यांच्यावर पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@