जम्मू काश्मीर: भारतीय लष्कर सीमेवर होणाऱ्या कोणत्याही स्वरुपाच्या कारवाईसाठी आम्ही सदैव तयार आहोत. कोणी कितीही धमक्या दिल्या तरी त्याचा लष्करावर परिणाम होणार नाही, असा सडेतोड जबाब उत्तर कमांडचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी दिला आहे. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी एका सर्जिकल स्ट्राइकच्या बदलल्यात १० सर्जिकल स्ट्राइक्स करण्याचा इशारा दिला होता.
सिंग म्हणाले, घुसखोरांना रोखण्यासाठी सीमेवरील विविध भागात आपल्या विजवाहक तारांचे कुंपण सातत्याने कार्यरत आहेत. या विजवाहक कुंपणाचा खुपच चांगला परिणाम होत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दहशती कारवाया आणि घुसखोरांना रोखण्यात आपल्याला यश आले आहे.
लष्कराला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संपूर्ण आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून दहशतवादी कारवायांसाठी उभारण्यात आलेल्या पायाभूत सुविधांमध्ये अद्याप कुठलाही बदल झालेला नाही. दहशतवादी कारयावांसाठी त्यांना पाककडून रसद पुरवलीच जात आहे. त्यामुळेच पाकिस्तानातून दहशतवादाचे प्रशिक्षण घेऊन आलेल्या घुसखोरांना रोखण्यात अडचणी येत आहेत. याला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार असल्याचेही यावेळी लेफ्टनंट जनरल रणबीर सिंग यांनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/