हरियाणा : हत्याकांड व देशद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू संत रामपाल याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. रामपाल याच्यासह एकूण १३ जणांना हिस्सार न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. मागील गुरुवारी (११ ऑक्टोबर) रोजी रामपाल याच्यासह २९ जणांना हिस्सार न्यायालयाने दोषी ठरविले होते.
रामपालला शिक्षा सुनावल्यानंतर कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये साठी न्यायालय परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चार महिला आणि एका मुलाच्या हत्येप्रकरणी २०१४ पासून रामपाल कैदेत होता. त्याप्रकरणी न्यायालयाने आज शिक्षा सुनावली. रामपालवर वेगवेगळे गुन्ह्याची नोंद होती. त्यामुळे पिडीतांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
काय आहे प्रकरण
रामपाल याने २००६ मध्ये ‘सत्यार्थ प्रकाश’ या पुस्तकातील काही मुद्द्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आर्य समाज आणि रामपाल समर्थकांमध्ये वादावादी झाली होती. या वादात ३ जणांचा मृत्यू झाला होता तर १६० जण जखमी झाले होते. तसेच १९ नोव्हेंबर २०१४ मध्ये रामपाल याच्या सतलोक आश्रमात पोलिस आणि रामपाल समर्थक यांच्यात धुमश्चक्री झाली होती. यात पाच सहा जणांचा मृत्यू झाला होता. यावरून रामपाल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशा प्रकारचे वेगवेगळे गुन्हे रामपाल याच्यावर नोंदवलेले होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/