ही अतिक्रमणे हटविण्यासाठी एक विशेष समिती नेमण्यात यावी. अशी विनंती म्हाडाने राज्य सरकारला केली. राज्य सरकारची परवानगी मिळाल्यानंतर विशेष अतिक्रमणविरोधी पथकांद्वारे या झोपड्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे कळते. ही अतिक्रमणे हटविल्यानंतरच या भूखंडांचे नेमके क्षेत्रफळ किती? त्यावर एकूण किती घरबांधणी करता येईल. याविषयीचा आराखडा तयार करता येईल. सध्या या भूखंडांवर झोपड्यांमुळे अतिक्रमण झाल्याने त्या भूखंडांच्या क्षेत्रफळाविषयी नेमका अंदाज बांधता येत नाही.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/