नवी दिल्ली : भाजपने आजवर केवळ समाजसेवाच केली आहे, दुसरे काही नाही. भाजपने सत्तेचा वापर लोकांमध्ये आनंद वाटण्यासाठीच केला, तिथेच काँग्रेस ने राजकीय फायद्यासाठी समाजाचे विभाजन केले आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी हल्ला चढविला. मोदी अॅपवरून भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले की, फक्त एका घराण्याचा फायदा करून देण्यासाठी काँग्रेस ने गेल्या ६० वर्षांपासून समाज वाटण्याचे काम केले आहे. भाजपने समाजाला एकत्र करण्याचा आणि आनंद देण्यावरच भर दिला आहे. निवडणुकांमध्ये इतर राजकीय पक्षांना हरविणे ही बाब आमच्यासाठी अहंकाराची नाही, तर निवडणुकीत मिळालेला विजय हा आमच्यासाठी लोकसेवा करण्याची संधी उपलब्ध करीत असतो, असे त्यांनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/