आज आश्विन शुद्ध प्रतिपदा अर्थात घटस्थापना, नवरात्रीची पहिली माळ. पहिल्या माळेचे हे पहिले पुष्प देवी दुर्गेच्या चरणी वाहून पहिली मानवंदना देत आहोत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिला.
भारतीय महिला क्रिकेट संघ म्हटले की सर्वप्रथम डोळ्यापुढे उभे राहते ते कर्णधार मिताली राज हिचे नाव. महिला क्रिकेट विश्वात तिने आपले वेगळे असे स्थान निर्माण केले आहे. क्रिकेट ही पुरुषांची मक्तेदारी असते हा समज तिने मोडून काढला. मितालीच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत आजवर तिने भारताला अनेक विजय मिळवून दिले. तिच्या या कर्तबगार कामगिरीसाठी तिला २०१५ मध्ये पद्मश्री किताब देऊन गौरविण्यात आले. स्पोर्ट्समध्ये आपले करिअर घडवू इच्छिणाऱ्या अनेक महिलांसाठी मिताली आदर्श बनली आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/