महाजन म्हणाल्या, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितले होते, की आरक्षण फक्त १० वर्षांसाठी आवश्यक आहे. आरक्षणाने देशाचे कल्याण होणार आहे काय?, असा प्रश्नही सुमित्रा महाजन यांनी उपस्थित केला. देशाला पुढे नेण्यासाठी आंबेडकरांनी दिलेल्या मार्गाने चालणे गरजेचे आहे. लोकांमध्ये देशाबद्दलची भक्ती वाढणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. संसद आरक्षण वाढवत चालले आहे. प्रत्येक वेळी १० वर्षांसाठी आरक्षण वाढवले जात आहे. एकदा तर आरक्षणाची मुदत २० वर्षांसाठी वाढवण्यात आली होती, असे कधीपर्यंत चालणार आहे. आरक्षणाची मुदत वाढवण्यामागे काय विचार आहे. आमच्यासाठी सर्व धर्म समान आहेत. आज देशाला आणि समाजाला तोडणारी ताकद सक्रिय आहे. आदिवासींचे धर्म परिवर्तन केले गेले. परंतु आमच्या सरकारने धर्म परिवर्तनविरोधी कायदा केला. तसेच आरक्षणासंदर्भात सर्व पक्षांनी एकत्र येऊन विचारविनिमय करण्याची गरज आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागले.”
जातीपाती, धर्म आदी मुद्द्यांवर राजकारण करता येणार नाही, कारण कायद्याचे सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी संसदेत सर्वच पक्ष मतदान करत असतात. तसेच यावेळी महाजन यांनी व्यंकय्या नायडूंच्या भाषणाचाही उल्लेख केला. देशाचा विचार सर्वात पहिला यायला हवा, लोकांनी जन, गण, मनसंदर्भात विचार करायला हवा, लोकांना देशाचा इतिहास आणि साहित्यासंदर्भात माहिती असायला हवी, असेही त्या म्हणाल्या आहेत.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/