हिंदी राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाची भाषा बनावी -केशरी नाथ त्रिपाठी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
हिंदी विश्वविद्यालयाचा २० वा स्थापना दिवस उत्साहात साजरा
 


वर्धा: देश-विदेशात एक प्रमुख भाषा तसेच भारतीयता प्रकट करणारी भाषा म्हणून हिंदीचा उपयोग केला पाहिजे. हिंदी आमची राष्ट्रीय अस्मिता, स्वाभिमान आणि सन्मानाची भाषा झाली पाहिजे. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हिंदी जनमनाची भाषा व्हावी. इतर भारतीय भाषामधील बोली आणि शब्दांचा उपयोग हिंदीत केला तर ही भाषा आणखी समृद्ध होईल, असे विचार पश्चिम बंगालचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांनी व्यक्त केले. ते येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या २० व्या स्थापना दिवस समारंभात मुख्य अतिथि म्हणून बोलत होते.
 
 
विश्वविद्यालयचा २० वा स्थापना दिवस मोठया उत्साह आणि उल्हासात सोमवार, ८ जानेवारी रोजी विश्वविद्यालयाच्या अनुवाद व निर्वचन विद्यापीठ भवनाच्या प्रांगणात भारतेंदु सभा मंडपात साजरा करण्यात आला.  यावेळी विश्वविद्यालयाच्या वतीने मालती जोशी, मध्य प्रदेश, डॉ. राजेंद्र प्रसाद मिश्र, ओरिसा, तेजेंद्र शर्मा, लंडन, डॉ. रणजीत साहा, दिल्ली, डॉ. तात्याना ओरांसकाइया, जर्मनी, प्रो. मिलेना ब्राटोइएवा, बल्गारिया, डॉ. पी. के. बालसुब्रमण्यम, तमिळनाडु, सुरेश शर्मा, महाराष्ट्र यांना राज्यपालांच्या हस्ते ‘हिंदी सेवी सन्मान’ प्रदान करण्यात आला.
 
 
विश्वविद्यालयाचा विकास महात्मा गांधी व विनोबा भावे यांची कर्मभूमि वर्धा येथे एका दृढ़ निश्चयाने होत आहे. हे विश्वविद्यालय राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख सिद्ध करत आहे. वर्धेची भूमि स्वातंत्र्य संग्रामाची असून राष्ट्रपिता महात्मा गांधी, वि. दा. सावरकर, लोकमान्य टिळक व हेगडेवार यांच्या महान विचारांचे सिंचन येथे होत आहे असे त्रिपाठी यावेळी म्हणाले. 
@@AUTHORINFO_V1@@