दुबई: ५ व्या दिव्यांग क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय दिव्यांग क्रिकेट संघ सज्ज झाला आहे. आज भारत वि. ऑस्ट्रेलिया संघ आमने सामने येणार आहे. दुबई येथे होत असलेल्या या विश्वचषक सामन्यात भारताचा संघ या सामन्यासाठी सध्या पूर्णपणे सज्ज झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
आज भारताचा पहिलाच सामना असल्याने हा सामना भारतीय संघासाठी महत्वाचा मानला जात आहे. हे विश्वचषक कालपासून सुरु झाले असून २१ जानेवारी पर्यंत खेळले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सामन्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. भारताच्या दिव्यांग क्रिकेट क्रिकेट संघाचे नेतृत्व अरविंद कुमार रेड्डी हे करत आहेत.
२०१४ मध्ये भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाने हा विश्वचषक भारताच्या नावावर केला होता. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाकडून बऱ्याच अपेक्षा ठेवल्या जात आहे.