चारा घोटाळा प्रकरणी लालू यांना साडेतीन वर्षाचा तुरुंगवास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |
 
 
 
रांची : चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरवण्यात आलेले राजद प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या १६ अन्य साथीदारांना न्यायालयाने साढेतीन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच त्यांना ५ लाख रुपयांचा दंड देखील भरावा लागणार आहे. रांची येथील सीबीआयचे विशेष न्यायालय आज लालू आणि त्यांच्या अन्य साथीदारांच्या शिक्षेसंबंधी अंतिम सुनावणी दिली.
 
ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून करण्यात आली. गेल्या तीन दिवसांपासून लालू प्रसाद यादव यांच्या शिक्षेसंबंधीची तारीख पुढे ढकलली जात होती. त्यामुळे लालू यांना शिक्षा कधी सुनावली जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र आज अखेर त्यांना शिक्षआ सुनावण्यात आली.
 
याआधी चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तूर्तास ते जामीनावर तुरुंगाच्या बाहेर होते. लालू प्रसाद यादव यांनी १९९० च्या दशकात बिहारचे मुख्यमंत्री असताना चाऱ्याच्या पैशांसंबधी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता, या संबंधी त्यांना आता शिक्षा सुनावण्यात आली.
 

काय आहे प्रकरण ?

चारा घोटाळा हा बिहारच्या राजकारणातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जातो. १९९६ मध्ये पशू खाद्यासाठी सरकारी खजिन्यातून ९५० कोटी रुपये घेण्यात आले होते, परंतु त्यावेळचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते जगन्नाथ मिश्रा यांनी हे सर्व पैसे खाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. यानंतर भाजपने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती, यामध्ये लालू यांच्या हात असल्याचे दिसू लागल्यानंतर लालू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर न्यायालयाने त्यांना यात दोषी ठरवत या निवडणूक बंदी देखील घातली होती.

@@AUTHORINFO_V1@@