बिहार येथे तरुणाचे अपहरण बळजबरीने लावले लग्न

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jan-2018
Total Views |


 
बिहार :  बिहार येथे तरुणांचे अपहरण करुन त्यांचे बळजबरीने लग्न लावणे हे काही नवीन नाही, अशा अनेक बातम्या आजवर समोर आल्या आहेत. अशीच एक घटना नुकतीच बिहारच्या पटना येथे घडली. मित्राच्या लग्नासाठी आलेल्या अभियंत्याचे अपहरण करुन त्याचे बंदूकीच्या धाकावर लग्न लावून देण्यात आले. या लग्नाचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. यामध्ये हा तरुण सतत रडताना दिसून येत आहे.
 
 
 
 
विनोद कुमार असे अपहरण करण्यात अलेल्या तरुणाचे नाव आहे. विनोद बोकारो स्टील प्लांटमध्ये कनिष्ठ व्यवस्थापकाच्या पदावर कार्यरत आहे. आपल्या मित्राच्या लग्नाला पटना येथील खुसरुपुर येथे आले असताना त्याचे अपहरण करण्यात आले. तसेच त्याला बंदूकीचा धाक दाखवत त्याचे लग्न लावून देण्यात आले. मोकामा येथील पंडारक या गावात हे लग्न लावण्यात आले. बड्या नेत्याला भेटून बदली करवून देतो असे आमीष दाखवत विनोदच्या मित्राने त्याला मोकामा येथे आणले असे सांगण्यात येत आहे.
 
लग्न लावून देताना वधू पक्षातील लोक "तुला जीवे मारत नाहीयोत केवळ लग्न लावून देत आहोत." असे म्हणत त्याचे बळजबरीने लग्न लावून देण्यात आले.
 
भारतात महिलांचे अपहरण, त्यांचे बळजबरीने लग्न अशा अनेक घटना समोर येतात मात्र स्त्रिया काय बिहार येथे पुरुष देखील सुरक्षित नाही असे या घटनेवरुन पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
@@AUTHORINFO_V1@@