‘स्वच्छता दर्पण रॅकिंग’मध्ये चंद्रपूर देशात अग्रेसर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2018
Total Views |

बीड चौथ्या क्रमांकावर, मूल्यांकनात ६९.११ टक्के गुण

चंद्रपूर जानेवारी अखेरीस होईल गोदरीमुक्त





चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत केंद्र शासनाने संपूर्ण जिल्हे गोदरीमुक्त करण्याचा संकल्प केला असून, त्यासाठी देशभरातील जिल्ह्यांचे ‘स्वच्छता दर्पण रॅकिंग’ करण्यात आले. त्यात देशात आदिवासीबहुल व मागास समजल्या जाणार्‍या चंद्रपूर जिल्ह्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. या जिल्ह्याला ६९.११ टक्के गुण मिळाले.

केंद्र शासनाने केलेल्या मूल्यांकनात महाराष्ट्रातील बीड जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. दुसर्‍या क्रमांकावर मेघालयातील वेस्टखसी हिल्स, पंजाबमधील अमृतसरचा तिसरा, तर राजस्थानमधील डोलपूर जिल्ह्याला पाचवा क्रमांक मिळाला आहे.

महाराष्ट्रातील नाशिक ७, लातूर ९, अहमदनगर १०, उस्मानाबाद १६, औरंगाबाद ३८, अकोला ४२, परभणी ४५, वाशिम ५०, धुळे ५५, हिंगोली ६०, जळगाव ६३, तर अमरावती जिल्हा ६५ व्या क्रमांकावर आहे.

ग्रामीण भागातील गावे सुंदर व्हावी, गावात शाश्वत स्वच्छता कायम राहावी, यासाठी केंद्र व राज्य शासनाने स्वच्छ भारत अभियान सुरू केले. राज्यात चंद्रपूर नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. केंद्र पुरस्कृत अभियानात चंद्रपूर जिल्हा परिषदेला ३ लाख ३ हजार १३५ वैयक्तिक प्रसाधनगृहे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. हे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने पूर्णत्वास नेले आहे. जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्याचे निकष देण्यात आले होते. त्यात जिल्हा परिषदेला आतापर्यंत ८२३ ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्यात यश आले असून, लवकरच उर्वरित 4 ग्रामपंचायती गोदरीमुक्त करण्याचा संकल्प जिल्हा परिषदेने केला आहे.

येत्या जानेवारी अखेरपर्यंत संपूर्ण जिल्हा गोदरीमुक्त करण्याचा ध्यास घेतला गेला असून, तशी वाटचाल सुरू केली आहे. या कामात चंद्रपूर जिल्हा परिषदेला ४२.५० टक्के गुण प्राप्त झाले आहे. नादुरुस्त प्रसाधनगृहांचे काम करण्यात जिल्हा परिषद मागे पडली. जिल्ह्यात २२ हजार नादुरुस्त प्रसाधनगृहे आहेत. त्यापैकी आतापर्यंत ६ हजार प्रसाधनगृहांचे काम करण्यात आले असून, उर्वरित कामे प्रगतिपथावर आहेत. याशिवाय केलेल्या कामांचे चित्र ऑनलाईनमध्ये लोडिंग करावे लागतात. त्यातही जिल्हा परिषद मागे पडली आहे. या मूल्यांकनात ज्या कामांमध्ये कमी गुण मिळाले. त्या कामांची गती वाढवली जाईल. शिवाय कामे जलगतीने करून गावात शाश्वत स्वच्छता व त्या कामांची पारदर्शकता टिकविण्यावर भर दिला जाणार असल्याचे स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र मोहिते यांनी तभाला सांगितले.
 

जनतेच्या सहकार्याने यश : जितेंद्र पापडकर

जिल्ह्यातील  १४ तालुक्यातील ८२३ पंचायती गोदरीमुक्त करण्यात यश आले असून, जिवती तालुक्यातील चार ग्राम पंचायती शिल्लक आहेत. त्या लवकरच गोदरीमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. मूल्यांकनात ज्या त्रुटी आढळल्या, त्या पूर्णत्वास नेण्याचा आमचा प्रयत्न राहील. जनतेच्या सहकार्यामुळेच चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वल ठरणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर यांनी महा MTB ला दिली.

@@AUTHORINFO_V1@@