दिल्ली: भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आज आग्नेय आशियाच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या आहेत. आज नवी दिल्ली येथील विमानतळावरून सुषमा स्वराज आग्नेय आशियाच्या पाच दिवसीय दौऱ्यासाठी रवाना झाल्या असून रवाना झाल्या आहेत. २०१८ मधील सुषमा स्वराज यांचा हा पहिलाच आग्नेय आशियाचा दौरा असणार आहे.
या दौऱ्यात सुषमा स्वराज इंडोनेशिया, थायलंड आणी सिंगापूर शहरांच्या भेटीला जाणार आहे. भारताच्या ‘अॅक्ट इस्ट पॉलीसी’ च्या अंतर्गत हा दौरा असणार आहे. सुषमा स्वराज या बऱ्याच कालावधीनंतर विदेश दौऱ्यावर गेल्या आहेत. काही महत्वाच्या मुद्द्यांवर या दौऱ्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या दौऱ्यात भारताचे परराष्ट्र धोरण अजून मजबूत करण्याच्या उद्देशाने स्वराज या दौऱ्यासाठी गेल्या आहेत.