गरजूंपर्यत योजनांची माहिती पोहोचणे गरजेचे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Jan-2018
Total Views |

विधी सेवा शिबीरामध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांचे प्रतिपादन

 

 
 
 
नाशिक : ’’समाजातील दुर्बल गरजूंपर्यंत योजनांची माहिती पोहोचणे गरजेचे असून न्यायालयांनी त्यासाठी योगदान देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सूचित केले आहे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने आयोजित केलेल्या मेळाव्याच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध आहे,’’ असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी केले.
 
विधी सेवा शिबीर व शासकीय योजनांच्या मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. नितीन ठाकरे, जिल्हा सरकारी वकील अजय मिसर आदी उपस्थित होते.
 
शिंदे यावेळी म्हणाले की, ’’शासन राबवत असलेल्या योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनाच्या अधिकारी कर्मचार्‍यांनी त्यांच्या अडचणी समजावून घ्याव्या व त्यांना मार्गदर्शन करावे. एकाच ठिकाणी माहिती मिळत असल्यामुळे त्याचा उपयोग गरजू दुर्बल लोकांपर्यंत पोहोचण्यास होईल,’’ असे ते म्हणाले.
 
 
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने बी. डी. भालेकर मैदान, कालिदास रंगमंदिराजवळ, शालिमार, नाशिक येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून मेळाव्यास भेट देणार्‍या नागरिकांना योजनांची माहिती देण्यासाठी शासकीय विभागांनी २९ स्टॉल्स उभारले आहेत. यामध्ये पोलीस आयुक्तालय, महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, कौशल्य विकास विभाग, जिल्हा अधीक्षक डाकघर (पोस्ट विभाग), जिल्हा पोलीस अधीक्षक, पशूसंवर्धन विभाग आदी विभागांनी स्टॉल उभारले आहेत.
 
डॉ. सिंगल म्हणाले की, ’’ग्रामीण भागातील गरिबांना त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती कोठे मिळेल हे माहीत नसल्यामुळे प्रयत्न करूनदेखील ती मिळत नाही व त्यापासून वंचित राहावे लागते. मेळाव्याचा त्यांना फायदा होईल. ही माहिती अनेकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे,’’ असे त्यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@