लालू प्रसाद यादव यांचे आज ठरणार भवितव्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
रांची: चारा घोटाळ्यात दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव समेत १५ आरोपींच्या भविष्याचा निर्णय आज होणार आहे. आज रांचीमध्ये केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचे विशेष न्यायालय या प्रकरणावर सर्व आरोपींसंबंधी अंतिम निकाल देऊन त्यांच्या शिक्षेसंबंधी सुनावणी करणार आहे. त्यामुळे आज लालू प्रसाद यादव सहित १५ आरोपींच्या भविष्याचा निर्णय न्यायालय आज करणार आहे.
 
२३ डिसेंबरला चारा घोटाळाप्रकरणी लालुंसह या प्रकरणातील सर्व २२ आरोपींना रांची येथील सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आले होते. यानंतर सीबीआयने दाखल केलेले सर्व आरोपपत्र आणि या संबंधातील सर्व पुराव्यांची छाननी करून या सर्व आरोपींमधील फक्त जगन्नाथ मिश्रा यांची मुक्तता केली व लालुंसह उरलेले सर्व आरोपी हे या प्रकरणात दोषी असून ते शिक्षेसाठी पात्र असल्याचे न्यायालयाने नमूद केले होते.
 
चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना ५ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तूर्तास ते जामीनावर तुरुंगाच्या बाहेर आहेत. लालू प्रसाद यादव यांनी १९९० च्या दशकात बिहारचे मुख्यमंत्री असताना चाऱ्याच्या पैशांसंबधी भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता, या संबंधी त्यांना आता शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
 
काय आहे प्रकरणी ?
चारा घोटाळा हा बिहारच्या राजकारणातील आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा मानला जातो. १९९६ मध्ये पशू खाद्यासाठी सरकारी खजिन्यातून ९५० कोटी रुपये घेण्यात आले होते, परंतु त्यावेळचे बिहारचे मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस नेते जगन्नाथ मिश्रा यांनी हे सर्व पैसे खाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता. यानंतर भाजपने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती, यामध्ये लालू यांच्या हात असल्याचे दिसू लागल्यानंतर लालू यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर न्यायालयाने त्यांना यात दोषी ठरवत या निवडणूक बंदी देखील घातली होती.
 
@@AUTHORINFO_V1@@