जिल्हा बँकेची थकीत वसुली करा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Jan-2018
Total Views |

जिल्हा बँकेचे प्रशासक भालेराव यांचे आदेश

 

 
 
नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कामकाजात यामागे काय झाले, त्यापेक्षा आता पुन्हा बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तसेच सभासद, शेतक-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी कामकाजात सुधारणा घडवून प्राधान्याने जिल्हा बँकेची थकीत वसुली करावी, अशी तंबी जिल्हा बँकेचे प्रशासक तथा विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी दिली आहे.
 
शनिवारी जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर भालेराव यांनी प्रशासकपदाची सूत्रे स्वीकारली व काही काळ बँकेत थांबल्यानंतर ते रवाना झाले होते. सोमवारी बँकेचे कामकाज सुरू झाल्यानंतर छोटेखानी समारंभात भालेराव यांनी बँकेचे अधिकारी व कर्मचा-यांशी संवाद साधला. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामकाजामुळे बँकेवर ही परिस्थिती ओढवली व परिणामी संस्थेवर प्रशासक नेमण्याचा कटू निर्णय रिझर्व्ह बँकेला घ्यावा लागल्याचे त्यांनी सांगून, बँकेचे कामकाज अधिकाधिक पारदर्शी कसे होईल याकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
 
बँकेची आर्थिक परिस्थिती, देणी याचा विचार करता साधारणत: २७०० कोटी रुपये विविध माध्यमांतून येणे बाकी असून, शेतकरी कर्जमाफीतून बँकेला ५०० ते ६०० कोटी रुपये मिळतील, परंतु ते बँकेचे आर्थिक व्यवहार सुरळीत करण्यासाठी पुरेसे नाहीत, त्यामुळे उर्वरित २२०० कोटी रुपयांची वसुली करण्याची जबाबदारी सर्व कर्मचारी, अधिका-यांची असून, प्राधान्याने ते काम हाती घ्यावे लागेल, अशी तंबीच त्यांनी भरली. अशी वसुली करताना कोणाच्या दबावाला अथवा राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता निर्भयपणे कामकाज करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
 
@@AUTHORINFO_V1@@