त्यांचा जीव तुमच्या हाती...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Jan-2018
Total Views |

अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाच्या प्रभावामुळे मुले काहीशी तुटक झाली आहेत. ती आई-वडिलांना फार काही सांगत नाहीत. याच वेळी पालकांनी सावध होऊन मुलांमधील स्वत:ला इजा पोहोचविण्याची किंवा त्याहूनही वाईट म्हणजे आत्महत्येची काही लक्षणे वेळीच ओळखली पाहिजेत.
काही वेळा मुलांमध्ये नैराश्याच्या खुणा स्पष्टपणे दिसतात. पण, पालक त्याकडे दुर्लक्ष करतात किंवा ‘नेहमीसारखा स्वभावातला लहरीपणा असेल,’ असे म्हणून कानाडोळा करतात. न्यायालयात हजेरी लावावी लागणे, कौटुंबिक तणाव, परीक्षेचा किंवा समवयस्क मुलांमुळे येणारा ताण आदी कारणांमुळे तरुणांमध्ये आत्मघातकी लक्षणे प्रामुख्याने दिसतात. यातील काहींचा लैंगिक छळ झालेला असतो किंवा काहींना प्रेमात अपयश आलेले असते.
मुलगा किंवा मुलगी खूपच लहरीपणाने वागत आहे किंवा आत्मघातकी वर्तन करत आहे, असे लक्षात आल्यास पालकांनी त्वरित शाळेतील समुपदेशकांची किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. मात्र, त्याचवेळेस मुलाच्या स्वातंत्र्याचा मान ठेवणेही आवश्यक आहे. त्याला किंवा तिला सतत प्रश्न विचारणे किंवा दबाव आणणे योग्य नाही. त्यांच्या चिंता त्यांनी तुमच्याजवळ उघड कराव्यात म्हणून त्यांच्यावर दबाव आणला, तर ते कदाचित वैतागतील आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी टोकाचे पाऊल उचलतील.
पण, बरेचदा पालकांना हाच प्रश्न पडतो की, मुलांच्या मनात नेमके काय चालले आहे, ते ओळखायचे कसे? त्यासाठी काही प्रसंग, संभाषणाचे विषय इथे नमूद करत आहोत. - जेव्हा मुले मृत्यू किंवा मरणाबद्दल वारंवार बोलतात किंवा अगदी नाहीसे होण्याबाबत, उडी मारण्याबाबत किंवा स्वत:ला गोळ्या घालून घेण्याबाबत किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील स्वयं-इजेबद्दल बोलतात, अशावेळी त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करण्याची शक्यता नाकारता येत नाही.- जेव्हा मुले मृत्यू किंवा घटस्फोटासारख्या परिस्थितीजन्य संकटामुळे त्यांची सर्वात जवळची व्यक्ती गमावतात, नाते तुटल्यानंतरच्या काळातून जात असतात, जवळच्या मित्राला गमावून बसतात किंवा अन्य मित्रांना भेटण्यात अजिबात रस घेत नाहीत, तसेच पूर्वी त्यांना आवडणार्‍या एखाद्या छंदात ते अजिबात रस घेत नाहीत तेव्हा, व्यक्तिमत्वात झालेला आमूलाग्र बदल, निरिच्छता, नैराश्य, चिडचिडेपणा, उदासीनता, थकवा, निर्णय घेण्यात अडचणी अशी लक्षणे दिसत असतील, तर मुलांशी वेळीच चर्चा करून त्यांचे मन आणि मतपरिवर्तन करावे.
- शाळा, महाविद्यालये अथवा कामाच्या ठिकाणी साधी कामे करतानाही लक्ष केंद्रित करण्यास अडचणी येत असतील, मन रमत नसेल, गुंतत नसेल तर मुलांशी मनमोकळी चर्चा करून त्यांची समस्या समजावून घ्यावी. - काही मुलांना अधिक झोप येते, तर काहींना झोप येत नाही आणि अनेकांना रात्री वाईट स्वप्ने पडतात. तरुणांमध्ये झोपेत चालणे तसे सामान्य आहे, पण हीही एक शक्यता असू शकते. अमली पदार्थ किंवा मानसिक आजार नसूनही भ्रमहोणे हेही कारण असू शकते.
- मुलांच्या आहाराच्या सवयीतील बदलांवरही पालकांनी लक्ष ठेवावे. कारण, टोकाच्या मानसिक अवस्थेत काही जण जास्त खातात, तर काहींची भूकही मरते.
- काही प्रसंगांमध्ये तर मुले आत्मसन्मान हरवून बसतात. आपण अत्यंत निरुपयोगी, लाजिरवाणे आणि अपराधी आहोत, असे त्यांना दैनंदिन कामे पार पाडतानाही वाटते. स्वत:बद्दलचा तिरस्कार वाढीस लागला की, त्यांना वाटू लागते की, ते आसपास नसतील, कोणत्या उपक्रमात सहभागी नसतील तर लोकांना अधिक चांगले वाटेल.
- गोष्टी कधीच सुधारणार नाहीत आणि काहीच कधीच बदल होणार नाही, असे त्यांना वाटते.
- सहसा उपचारासाठी येणार्‍या मुलाला फार्माकोथेरपीची औषधे घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे ताण, नैराश्य आणि झोपमोडीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. याशिवाय त्याला किंवा तिला व्यक्तिगत मानसोपचार दिले जातात. यामध्ये आयुष्यातील आव्हानांचा सामना अधिक चांगल्या पद्धतीने कसा करायचा याचे समुपदेशन त्यांना द्यावे लागते आणि हे करण्यात कोणत्या प्रकारची मानसिकता अडथळा ठरत आहे, हे ओळखण्यास त्याला सांगितले जाते. या तरुण मुलाला/मुलीला कुटुंबातल्या सदस्यांनी समजून घ्यावे आणि आधार द्यावा, या उद्देशाने कुटुंब उपचार सत्रे घेतली जातात. तुमच्या जवळच्या लोकांचे आयुष्य सुधारायचे असेल, तर लक्षणे वेळीच लक्षात घेणे आवश्यक आहे.
 
- तारा मेहता 
(लेखिका एस. एल. रहेजा रुग्णालय 
येथे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत.)
@@AUTHORINFO_V1@@