म्हाडाच्या ५,४४६ पात्र लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा मिळण्याचा मार्ग सुकर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळांतर्फे विरार बोळींजमध्ये उभारण्यात आलेल्या ५,४४६ सदनिकांच्या सर्वात मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पाला वसई-विरार महानगरपालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे सोडतीमधील यशस्वी व पात्र अर्जदारांना सदनिकांचा ताबा देण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
 
दरम्यान, येत्या आठ दिवसांत य सोडतीमधील यशस्वी व पात्र अर्जदारांना देकारपत्र देण्यात येणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत टप्पा १ व टप्पा २ मध्ये ५० इमारतींमधील ५,४४६ सदनिकांची २०१४ व २०१६ मध्ये संगणकीय सोडत काढण्यात आली. २२ ते २४ मजल्याच्या असणार्‍या या सर्व इमारतींचे बांधकाम मार्च २०१७ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. तथापि, बहुमजली इमारतीसाठी आवश्यक असलेली अग्निशमन शिडी वसई-विरार महानगरपालिकेकडे नसल्याने सदर शिडी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली होती. याच अनुषंगाने वसई-विरार महानगरपालिका, म्हाडा व संचालक, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांच्यात झालेल्या बैठकीत अग्निशमन शिडीच्या किमतीसाठी म्हाडाने वसई-विरार महानगरपालिकेला २०.४५ कोटी रुपये रक्कम अदा केली आहे.
 
तसेच अग्निशमन केंद्राची उभारणीही करून दिली आहे. म्हाडाचे उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांच्या प्रयत्नामुळे हा प्रकल्प मार्गी लागला. सदर प्रकल्पाअंतर्गत तीन टप्प्यांत दहा हजार परवडणारी घरे उभारण्यात येणार आहेत.
 
@@AUTHORINFO_V1@@