सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांचा कट उधळला

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
छत्तीसगड : छत्तीसगडमधील तर्रेम गावात आज सुरक्षा रक्षकांकडून नक्षलवाद्यांचा कट उध्वस्त करण्यात आला आहे. या भागातून सुरक्षा रक्षकांनी १० किलोग्रॅम आणि १८ किलोग्रॅमचे दोन बॉम्ब जप्त केले आहे. तर्रेम भागात नक्षलवाद्यांकडून हे दोन बॉम्ब लावण्यात आले होते. या भागात अजून काही बॉम्ब लावले आहेत काय याचा शोध सध्या सुरक्षा रक्षकांकडून घेतला जात आहे. 
 
रस्त्यावरून जाणाऱ्या पोलिसांना तसेच सुरक्षा रक्षकांना मारण्याच्या उद्देशाने हे बॉम्ब लावण्यात आले होते. काही महिन्यापूर्वी अशाच प्रकारचे बॉम्ब नक्षलवाद्यांकडून लावण्यात आले होते. नक्षलवादी पोलिसांना तसेच सुरक्षा रक्षकांना जीवे मारण्यासाठी अश्या युक्त्या करीत असतात. मात्र यावेळी सुरक्षा रक्षकांनी त्यांचा कट उध्वस्त केला. 
 
 
@@AUTHORINFO_V1@@