तर क्रीझवरुन अशा व्यक्त केल्या विराटने अनुष्कासाठी आपल्या भावना..

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |

 
सेंचुरिअन :  दक्षिण अफ्रिका आणि भारत यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात गेल्या सामन्यापेक्षा भारताचा खेळ नक्कीच उत्तम आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने देखील उत्तम खेळाचे प्रदर्शन करत १५० धावा पूर्ण केल्या आहेत. मात्र चाहत्यांना केवळ याचेच कौतुक नसून आपल्या या धावांचे श्रेय विराटने अनुष्काला ज्या प्रकारे दिले त्याचे कौतुक अधिक आहे. १५० धावा पूर्ण केल्यानंतर खेळाच्या मैदानावरून त्याने अनुष्कासाठी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
 
 
 
 
अनुष्काने लग्नाच्यावेळी विराटला घातलेली अंगठी खेळाच्या वेळी विराटने गळ्यात घातली असून, १५० धावा पूर्ण झाल्यावर त्याने या अंगठीला ओठांजवळ नेत अनुष्काकडे बघत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याच्या या हावभावांमुळे 'विरुष्का'च्या चाहत्यांना वेड लागले आहे. तसेच समाज माध्यमांवर याविषयी चर्चा होत आहे.
 
याआधी देखील क्रीझवरुन अनुष्काला फ्लाइंग किस दिल्यानंतर अनुष्का आणि विराट चर्चेत होते. मात्र आता लग्नानंतरही त्यांच्या असलेल्या प्रेमाचे त्यानी वेगळ्या पद्धतीने प्रदर्शन केल्यामुळे तसेच त्याच्या चांगल्या खेळाचे श्रेय त्याने अनुष्काला दिल्यामुळे विराटची प्रशंसा होत आहे.
@@AUTHORINFO_V1@@