जैश-ए-मोहम्मदच्या पाच अतिरेक्यांचा खात्मा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jan-2018
Total Views |

 

जम्मू-काश्मीर :
भारतीय सीमेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या पाच दशतावाद्यांचा भारतीय जवानांनी खात्मा केला आहे. हे सर्व दहशतवादी हे जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे सदस्य असून हे सर्व पाकव्याप्त काश्मीरमधील रहिवाशी आहेत.


दक्षिण जम्मूमधील उरी सेक्टरजवळील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून हे सर्व दहशतवादी भारतीय भूप्रदेशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. सुदैवाने याच वेळी भारतीय सैनिक या ठिकाणी गस्त घालत असताना, त्यांना हे दहशतवादी भारताचे सीमेमध्ये घुसखोरी करत असल्याचे दिसले. यानंतर दोन्ही गटांकडून झालेल्या चकमकीमध्ये हे पाच दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच या दहशतवाद्यांकडून काही महत्त्वाची कागदपत्रे आणि काही शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आले आहेत.

येत्या २६ तारखेला भारत आपला ६९ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर देशात काही ठिकाणी दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता गुप्तचर विभागाकडून व्यक्त केली गेली आहे. तसेच भारताच्या प्रत्येक स्वातंत्र्य दिनी आणि प्रजासत्ताक दिनी पाकिस्तानकडून भारताची कुरापत काढली जाते. त्यामुळे नवी दिल्लीसह जम्मू-काश्मीरमधील काही भागांमध्ये हायअलर्ट जारी करणात आला असून सीमेवरील गस्त देखील वाढवण्यात आल्या आहेत.
@@AUTHORINFO_V1@@