सेंच्युरीयन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यातील द. आफ्रिकेचा पहिला डाव संपला असून पहिल्या डावात आफ्रिका संघाने ३३५ धावांची आघाडी घेतली आहे.
सेंच्युरीयन येथील सुपर स्पोर्ट्स पार्क येथील मैदानावर नुकतीच या सामन्याला सुरुवात झाली आहे. द.आफ्रिका संघाने आपला ६ बाद २६९ धावांवर आपल्या डावाला सुरुवात केली होती. यावेळी प्लेसीस आणि केशव महाराज हे दोघे मैदानात खेळत होते. परंतु खेळाला सुरुवात झाल्यानंतर थोड्याच वेळात महाराज याला १८ धावांवरच भारतीय गोलंदाजांनी तंबूत परत धाडले. यानंतर कागीसो राबडा हा मैदानात आला परंतु थोड्याच वेळात अवघ्या ११ धावांवरच रबाडाला देखील भारतीय गोलंदाजांनी परत धाडले, नंतर शेवटचे दोन बळी घेऊन भारताने आफ्रिकेचा डाव ३३५ धावांवर संपुष्टात आणला.
तीन कसोटी सामन्याच्या या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावल्यानंतर दुसऱ्या सामन्याकडून भारताला मोठी आशा लागलेली आहे. काल सामन्याच्या सुरुवातीला आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी आफ्रिका संघाने नेहमीप्रमाणे आपल्या आक्रमक खेळीचे प्रदर्शन करत खेळा सुरुवात केली होती. बऱ्याच वेळानंतर भारताला पहिला बळी घेण्यात यश आले होते.