पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
नाशिक : शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणसमूहात ८३ टक्के इतका मुबलक पाणीसाठा उपलब्ध असला तरी महापालिकेला जुलै २०१८ पर्यंत आरक्षित पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन शासनातर्फे करण्यात आले आहे. महापालिकेकडून सद्यस्थितीत गंगापूर धरणातून प्रतिदिन १५.२० दलघफू पाण्याचा उपसा केला जात असून, ३१ जुलैपर्यंत ३००० दलघफू पाणी आरक्षण शिल्लक असल्याने यापुढे पाणी उपशाबाबत नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे.
 
महापालिकेला १५ ऑक्टोबर २०१७ ते ३१ जुलै २०१८ या कालावधीसाठी गंगापूर धरणातील ३९०० तर दारणा धरणातील ४०० दलघफू पाणी आरक्षित केले आहे. प्रतिदिन १४.८२ दलघफू पाणी उपशाप्रमाणे एकूण ४३०० दलघफू पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे.
 
महापालिकेने दि. १५ ऑक्टोबर २०१७ ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत गंगापूर धरणातून १२१०.४५ दलघफू तर दारणा धरणातून ८१.२२ दलघफू पाण्याची उचल केलेली आहे. दोन्ही मिळून १२९१.६७ दलघफू पाण्याचा उपसा झालेला आहे. फेब्रुवारीपासून उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढणार असून महापालिकेला त्यादृष्टीने नियोजन करणे भाग पडणार आहे. नागरिकांनीदेखील भरपूर पाणी आहे म्हणून कसेही वापरू नये, असे शासनाचे म्हणणे आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@