भारत चीन सोबत स्पर्धा करु शकत नाही : राहुल गांधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Dec-2017
Total Views |

 
नवी दिल्ली : भारत चीन सोबत प्रतिस्पर्धा करु शकत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ पोकळ घोषणाच देवू शकतात, त्यासाठी प्रत्यक्ष क-ती करु शकत नाही. भारतीयांचे स्मार्ट सिटीचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे, असे प्रतिपादन राहुल गांधी यांनी केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून एक व्हिडियो शेअर करत त्यांनी ही माहिती दिली.
 
 
 
 
राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवरुन चीन मधील एका स्मार्ट सिटीचा व्हिडिओ शेअर करत पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या पाठिराख्यांना लक्ष्य केले. स्मार्ट सिटी प्रकल्पाकरता दिलेल्या ९ हजार ८६० कोटी रुपयांपैकी केवळ ७ टक्के रक्कम खर्च झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
त्यामुळे भाजप नेत्यांनी निवडणूक काळात दिलेल्या रोजगार निर्मिती, स्मार्ट सिटी याविषयी दिलेल्या आश्वासनांवर लक्ष्य केंद्रित करावे, असे राहुल गांधी यांनी भाजपला टोला लगावत म्हटले आहे.
@@AUTHORINFO_V1@@