काश्मीर : काश्मिरमधील पुलवामा जिल्हात आज पहाटे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे चार जवान शहीद झाले असून, ३ जवान जखमी झाले आहेत. दरम्यान दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे.
पुलवामातील अंवंतीपोरा इथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या प्रशिक्षण केंद्रावर आज पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्याची सर्व जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी गटाने आहे.
तीन दहशतवाद्यांनी सीपीआरएफच्या तळावर प्रवेश करून अंदाधुंद गोळीबार केला. अशा प्रकारच्या आणखी एका हल्ल्याची शक्यता असल्याचे सीपीआरफकडून सांगण्यात येत आहे.
यात दहशतवाद्यांनी ग्रेनेडने हल्ला केला असून त्यानंतर भारतीय जवानांनी देखील या हल्लाला चोख प्रत्यूत्तर देत गोळीबार केला होता.